वनताराकडून महादेवी (माधुरी) साठी दयाळूपणा व विचारपूर्वक उपाययोजना
तसेच संस्थेने हेही स्पष्ट केले की, या हस्तांतरणाची कुठलीही शिफारस किंवा सुरुवात वंताराकडून करण्यात आलेली नव्हती आणि कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता.
वनतारासंस्थेने कोल्हापुरातील मंदिरातून हस्तांतरित करण्यात आलेल्या माधुरी नावाच्या (महादेवी) हत्तीणीबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की हा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशांनुसारच घेतला गेला होता. वनताराम्हणते, "कोल्हापुरातील भक्तगण, जैन मठाचे नेते आणि स्थानिक समाज यांच्या माधुरीबद्दलच्या भावना आम्ही पूर्णपणे समजून घेतो आणि त्यांचा आदर करतो." तसेच संस्थेने हेही स्पष्ट केले की, या हस्तांतरणाची कुठलीही शिफारस किंवा सुरुवात वंताराकडून करण्यात आलेली नव्हती आणि कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता.